Friday, June 20, 2025

वारकरी संप्रदाय आणि स्टार्टअप इकोसिस्टीम: एका इन्व्हेस्टमेंट बँकरचच्या नजरेतून:

 🚩 वारकरी संप्रदाय आणि स्टार्टअप इकोसिस्टीम: एका इन्व्हेस्टमेंट बँकरचच्या नजरेतून: 


आज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येणार.


पुण्यनगरी पुढचे तीन दिवस पावसाबरोबरच भक्तीरसात न्हाऊन निघणार


मी investment banker असल्यामुळे

Startup founders, mentors, events, journeys – या सर्व गोष्टींशी नेहेमी संबंध येतो.


पण आज थोडा खोलवर विचार केला…

आणि जाणवलं –

Startup ecosystem ही काही आपल्या नविन गोष्ट नाही. आपल्या महाराष्ट्रात ही ecosystem कित्येक शतकांपासून आहे…


कुठली??


अहो आपली वारकरी ecosystem.


कुठल्याही ecosystem मध्ये काही मूलभूत घटक असतात.

आणि आश्चर्य म्हणजे, ते सगळे आपल्या वारकरी संप्रदायातही आहेत.


असं बघा हं...वारकरी म्हणजे founders –

वेगवेगळ्या गावांतून, पार्श्वभूमीतून, कल्पनांतून आलेले.

संत म्हणजे mentors –

वाट दाखवणारे, अर्थ समजावणारे, डगमगणाऱ्या पावलांना आधार देणारे.

आणि विठोबा माऊली –

ज्याच्याकडे सगळे पाहतात, त्याच्याशी नातं जुळवतात – Chief Mentor.


म्हणतात ना "A true leader creates more leaders."

आपल्या विठू माऊलीने देखिल नेमकं तेच केलं –

ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत चोखा मेळा, संत जनाबाई, एकनाथ, गोरा कुंभार, सोयराबाई…

एकेक संत तयार झाले, आणि एकेक वारी घडत गेली.

ही ecosystem इतकी समावेशक की जाती, लिंग, वय, भाषा काहीच अडथळा ठरत नाही.


जसं Startup ecosystem मध्ये annual flagship events असतात –

TiECon, TechSparks, YourStory –

तशीच आपली आषाढी वारी!

दरवर्षी महाराष्ट्राच्या आणि इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून एकाच ध्येयासाठी लाखो प्रवासी निघतात –

नफा नाही, exit नाही – फक्त भेट व्हावी माऊलीची.


आता प्रश्न असा की –

सगळे वारकरी पंढरपूरला प्रत्यक्ष जातात का? नाही ना? पण त्यांना वाटतं – आपणही याच वारीचा एक भाग आहोत.


आणि पंढरीला गेले तरी कळसाचं दर्शन घेऊन विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाचं समाधान मानतात. 



तसंच आपल्यालाही वाटू शकतं – विठू माऊली पालखी मुक्कामी असेल,

तुळशीमाळ विकणाऱ्या माऊलीत असेल,

टाळ चिपळ्यांच्या गजरात असेल,

वाासुदेवाच्या हाकेच्या सूरात असेल,

किंवा आपल्या घराच्या कोपऱ्यात लावलेल्या एका दिव्यातही असेल…


चला तर मग,

या वर्षी वारी जशी जमेल तशी अनुभवूया.

टाळ वाजवून, दिवा लावून, किंवा फक्त मनात माऊली आठवून.


कारण आपण सगळेच प्रवासी आहोत –

कुणी स्टार्टअपच्या वारीत, तर कुणी विठोबाच्या.


✍🏻 संकल्पनेपासून समाधानापर्यंत – हीच खरी वारी.


संकेत विजयकुमार देशपांडे 

पुणे, कल्याण. 

२० जून २०२५


No comments:

Post a Comment