Sunday, January 29, 2017

तुंग तिकोना

तुंग तिकोना 14-15 डिसेंबर 2013

जुनी एफबी वरील पोस्ट शेअर करत आहे

पहिल्यांदाच काही तरी लिहायला घेतोय... कंपल्सरी आराम म्हणून जमलं... सांभाळून घ्या. ट्रेक करायची खूप दिवसांपातूर इच्छा होती. अभय-कौस्तुभ प्रत्येक वेळी इन्वाइट करायचे पण मला आधी जमलं नाही. पण गेल्या वर्षी मी ठरवलं होतं की जेंव्हा तुंग-तिकोना कराल त्यावेळी मी येणारच. ठरलं एकदाचं..कारण पण तसच होतं..

पहीला ट्रेक तुंग-तिकोना केला 14-15 डिसेंबर 2013. मी, अभय, कौस्तुभ, बापू आणि खली दी ग्रेट..मजा आली..सुरवातीला 10-15 मिनिटानी धाप लागली पण नंतर काही इश्यू नाही आला... कल्याण हून 5-5.30 ला निघून आम्ही 8.30 पर्यंत तिकोना वाडी ला पोहोचलो.

तिकोना किल्ला हा खर्या खुर्‍या मावाळातला.. दोन रस्ते आहेत मुंबई हून जातांना. एक तर तुम्ही लोणावळ्यातून जाउ शकाता किंवा एक्सप्रेस वे हून लोणावळ्याचा सेकेंड एकझिट घेऊन जुना हायवे घ्यायचा आणि कामशेत नंतर उजवि कडे वळायचं.. आम्ही दुसरा रस्ता घेतला. मग रस्त्यात... लोहगड..विसपूर..विंचू काटा.. असे किल्ले बघत बघत आपण पुढे जातो.. काळे कॉलोनी (पवना नगर) पार झाले कि पुढे डावी कडे वळायाचं...मग लांबून आपल्याला तिकोना आणि तुंग दिसायला लागतात.. पवना धरणाच्या विसर्गा वरुन पुढे आलो कि घाट लागतो.. आणि मग खूप ऊंचं ठिकाणी आपण पोहोचतो.. डावी कडे तिकोना आणि त्याच्या विरुद्ध दिशेला तुंग आणि दोघांच्या मध्ये पवना धरणाचं विस्तिर्ण बॅक वॉटर..
घाट संपल्या वर लगेचच आपण तिकोना वाडीच्या कमानी पाशी येतो. तिथे डावी कडे वळून एक-दीड किमी पुढे आलो कि तिथे गाडी पार्क करायला जागा आहे.. अगदी सेफ.. तिथ पासून गडा वर पोहोचायला जास्तीत जास्त पाउण एक तास..वर पोहोचताना पवना धरणाचा विस्तीर्ण पाणी साठा.. आणि त्याच्या मधोमध तुंग.. नव्हे उत्तुंग !!! तसेच माथ्या वरुन संपूर्ण मावळ परिसर दिसतो..
गडा वर विशेष असं काही नाही. एक शंकराचं मंदीर आणि पाण्याचं टाकं. आम्ही देवळात ॐकार लावला.. मी तर पहिल्यांदाच... अगदी प्रसन्न वाटलं.. मग जेवणाचे डबे उघडले.. बटाट्याच्या काच्र्या.. ठेपले.. पोळ्या.. सगळ्यांना भुका लागल्या होत्या.. अगदी आडवा हात मारला.. मग थोडे आडवे पडलो.. आणि थोड्या वेळाने पाण्याच्या टाक्या जवळ आलो.. जिवंत झर्याचं थंड गार आणि अगदी गोड पाणी.. लाजवाब... आणि पाण्याच्या टाक्या जवळ जे काही गार वाटत होतं... बासच... वाटत होतं इथेच झोपावं. तिथे थोडा वेळ घालवला आणि मग उतरणी ला लागलो.. अर्ध्या तासात उतरलो असु.. मग वाटेत.. कोळ्वण ला जातांना काही चांगले स्पॉट्स लागले (पवना बॅक वॉटर्स).. तिथे जरा फोटो सेशन करून पुढे निघालो.. 
अभय ला किल्ल्या वर मुक्काम करायची खूप इच्छा होती पण मला त्यांना कोळवण ला प्रीतम (माझी बेटर हाफ) च्या घरी न्यायचं होतं. किल्ला छोटा असल्याने आणि आमच्या कडे बराच वेळ असल्याने आम्ही घरी मुक्काम करायचा ठरवलं..
साडे चार पर्यंत पोहोचलो असु कोळ्वण ला.

तिथे सावित्री काकू ने अगदी जावई ट्रीटमेंट दिली.. त्यामुळे अभय ची स्वयंपाक करायची इच्छा पूर्ण नाही झाली.. 

मग लिस्ट मध्ये असल्या प्रमाणे शिधा घेतला.. आणि घरी पोहोचलो.. चहा प्यालो.. शेतावर चक्कर मारली आणि घरी आलो.. तो पर्यन्य स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती... चुलीवरील भात आणि खरपूस तांदळाची भाकरी.. क्या बात है !!! चुली च्या धूरा मुळे सर्वांचे डोळे एकदम स्वच्छ झाले.. सगळा धूर घरात येत होता.. त्यात अभय ची अवस्था तर खूपच खराब झाली होती.. तो पूर्ण वेळ गंगा जमूना झाला होता.. असो..मला रेडियो फार आवडतो.. विशेष करून गावा कडे आल्या वर ऐकायला खूप छान वाटतं.. पुण्याचं १०१ एफ. एम. चालू होतं.. बॅकग्राउंड म्यूज़िक म्हणून बरं वाटतं.. मधूनच बातम्या मधूनच.. मराठी हिंदी गाणी.. सुरेख... आणि मुख्य म्हणजे.. मोबाईल ला रेंज नव्हती..एकही काडी नाही.. आजच्या दिवसात ही म्हणजे पर्वणी च म्हणायला हवी.

इथे सावित्री काकू ने अगदी जावई ट्रीटमेंट दिली.. त्यामुळे अभय ची स्वयंपाक करायची इच्छा पूर्ण नाही झाली.. 

जेवण झाल्या वर खरी धमाल आली.. कडक थंडी होती. टेंपरेचर ८-९ सेल्शिअस असेल.. शेकोटी करायचे अथक प्रयत्न झाले.. पण उपयोग काहीही नाही.. फक्त धूर... बापू ने खूप मेहनत घेतली होती..मग काही होत नाही असं बघून सर्व जण घरात आले.. रॉकेल चा कंदील होता (लाल्टेन).. तो हातात घेऊन (अर्थात ट्यूब लाइट बंद असताना) जरा हॉरर मूवी चा माहोल क्रियेट केला.. आणि सर्वांनी फोटो काढले.. त्यात कौस्तुभ आणि आमच्या खलि चे फोटो तर १ नंबर आले.. अंगात स्वेटर.. हातात ग्लव्स, स्कल कॅप, आणि ब्लांकेट सगळे टोटल फनी दिसत होते..





















११ वाजे पर्यंत सर्व जण झोपलो.. सकाळी उठून गावात एक चक्कर मारली.. दूध वगैरे आणले.. सावित्री काकू ने पोहे केले होते... ते खाऊन आम्ही ८.३०-९.०० पर्यंत तुंग कडे निघालो...

पुण्याहून तुंग कडे जायचं असेल तर.. शिळीम नंतर डावी कडे वळायाचे.. (कामशेत कडून जायचं असेल तर उजवी कडे).. बराच गावा गावा तून ऊंच सखल रस्ता जातो.. ह्या पूर्ण रस्त्यात आपण अनेक वेळा घाट चढतो आणि उतरतो..हिल्टन ची शिळीम इस्टेट क्रॉस झाली की थोड्या वेळाने एक फाटा येतो.. तो रस्ता लोणावळा... आय. एन. एस. शिवाजी.. अँबी वॅली करत येतो.. (मुंबई हून तुंग ला यायचे असेल तर).. त्या फाट्याला उजवी कडे वळाले (मुंबई हून येताना डावी कडे) की जरा वेळाने तुंग कडे जायचा रस्ता लागतो... डावीकडे एक लहानसं देऊळ आहे.. तिथे गाड्या पार्क करता येतात..डावी कडे ना वळाता सरळ गेलं की महिंद्रा हॉलिडेज चं तुंगी रेसोर्ट लागतं.. ते लॅंडमार्क म्हणून समजावं..

तुंग हा खरोखरच उत्तुंग आहे.. आपलं नाव तो सार्थ ठरवतो.. अगदी सरळ सोट दिसतो.. म्हणजेच.. मुरलेल्या ट्रेकर ला कळेल की ट्रॅवर्स चा रूट खूप आहे.. तुंग हा तर खरा टेहेळणी बुरूज होता.. किल्ला नव्हेच तो.. वर खूप ट्रॅवर्स आणि अगदीच अरुंद पायवाट आहे.. एका वेळी एकच माणूस पास होईल इतका..बिगिनर असल्या मुळे ठरवलं होतं की जिथे कॉन्फिडेन्स येणार नाही तिथे आगाऊ पणा नाही करायचा... सरळ थांबायचं. पण जमलं.. तुंग ला एका ठिकाणी एक कर्व होता.. मी आधी पुढे गेलो पण सारखा विचार करत होतो की येताना आपली अवस्था इथे खराब होणार.. तितक्यात मागून अमित (उर्फ जावई 'बापू' अभय चा जिजू) ने आवाज दिला.. की तो थांबतोय म्हणून.. त्याची पण माझ्या सारखीच अवस्था झाली होती... तो थांबला म्हणाल्या वर मी पण चान्स मारला आणि अभय ला म्हणालो मी पण थांबतो इथे.. त्याच्या बरोबर कोणी तरी पाहिजे ना.. झालं.. मग अभय कौस्तुभ आणि खलि उर्फ अमोल रानडे पुढे गेले आणि गड सर करून आले. ते आल्या वर आम्ही जेवलो आणि थोड्या वेळात उतरायला चालू केलं.

कल्याण ला परत जाताना आँबी वॅली करून पुढे आलो... पुढे आल्या वर लायन हेड पॉइण्ट लागला... इथून पण खूप छान व्यू आहे... अगदी इथे येई पर्यंत उत्तुंग आपल्याला दिसत रहातो.. समोरच्या दिशेला...लोणावळा.. खंडाळा... ड्युक्स नोज... वळ्वण डॅम आणि काही उंच सुळके बॅकड्रॉप ला आहेत... आपल्याला ते बघितल्या वर लक्षात येतं की हे लोकेशन बर्‍याच हिंदी सिनेमा मध्ये आपण बघितलेले आहे... बरेच जण सन सेट पाहायला इथ वर येतात.. अगदी पुण्या-मुंबई हून.. त्यामुळे ही चौपाटी च आहे म्हणा ना..
इथे फोटो सेशन करून चहा वगैरे पिऊन पुढे निघालो... अभय आणि (चक्क) बापू देखील (फॉर ओबवियस रिजन्स) एका स्पॉट वर अडकले होते...

ते आटोपून...५.००-५.१५ पर्यंत परती च्या प्रवासाला निघालो... ८.३०-९.०० पर्यंत कल्याण ला (हिशोब करून ) पोहोचलो... वाटेत येताना... पुढची मोहीम कुठे आखायची ह्याची चर्चा चालू होती.. बघुयात पुढची चढाई कुठे केली ते.


No comments:

Post a Comment